संतोष धुरींनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर वरळीतील प्रचाराचा राग धरल्याचा आरोप केला आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी छुपे लोक उघड झाले अशी प्रतिक्रिया दिली. तर, सचिन अहिर यांनी धुरींच्या पक्षबदलाच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, सहा-सात महिन्यांनंतर त्यांना कोणता साक्षात्कार झाला आणि त्यांनी कुठे ब्लड टेस्ट केली? अशी उपरोधिक विचारणा केली.