मराठी माणूस एकत्र येऊ नये यासाठी राजकारण सुरू असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. बाहेरील लोकसंख्या वाढवणे, राजकीय पक्षांत फूट पाडणे आणि जातींमध्ये भेद निर्माण करून मराठी अस्मिता कमकुवत केली जात आहे. मुंबईला महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचे प्रयत्न आजही सुरू असून, याविरोधात एकत्र येणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.