राज आणि उद्धव यांना एकत्र पहायला महाराष्ट्राला 20 वर्ष वाट का पहावी लागली ?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी 20 वर्षांनंतर एकत्र येत, दिलेल्या संयुक्त मुलाखतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका आणि मुंबईच्या भवितव्यासाठी हे दोन्ही नेते एकत्र आले आहेत. या मुलाखतीत महाराष्ट्रासमोरील संकटांवर चर्चा करण्यात आली.