अभिनेते महेश मांजरेकर यांनी मुंबईच्या सद्यस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी राजकीय युतीला करप्शन आणि कन्फ्युजनची युती संबोधत, ५० खोके प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तीन वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका न झाल्याने शहराची दुरवस्था आणि वाढते प्रदूषण यावर त्यांनी चिंता व्यक्त करत, मुंबईकर म्हणून मला लाज वाटते असे म्हटले आहे.