रवींद्र चव्हाणांनी विलासराव देशमुखांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे लातूरमध्ये तीव्र रोष निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरमध्ये सभा घेऊन विलासरावांबद्दल नितांत आदर व्यक्त केला. तसेच, चव्हाणांचे शब्द चुकीच्या पद्धतीने गेले असा खुलासाही केला. लातूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर डॅमेज कंट्रोलचा हा प्रयत्न महत्त्वपूर्ण मानला जात आहे.