ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं? असा सवाल चित्रा वाघ यांनी केलाय. गेली 25 वर्ष फक्त भाषणं केली, या व्यतिरिक्त दुसरं काही जमलं नाही असा टोला वाघ यांनी लगावला आहे. मुंबईतील पागडी इमारतीमध्ये मराठी माणूस पिढ्यानुपिढ्या अडकून पडला आणि माणसं मेली पण मराठी म्हणून छाती बडवणाऱ्या ठाकरेंनी मराठी माणसासाठी नेमकं काय केलं?