दिल्ली विधानसभेत विरोधी पक्षनेत्या आतिशी यांच्या वक्तव्यामुळे गोंधळ निर्माण झाला. प्रदूषणावरील चर्चेदरम्यान आतिशी यांनी गुरु तेग बहादुर यांचा अपमान केल्याचा आरोप भाजपने केला आहे. यामुळे सभागृहाचे कामकाज बाधित झाले असून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.