राजकारणात दोन भाऊ एकत्र आल्यास भाजपला मिरची का लागते, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि मुंबईचे मराठीपण टिकवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना फोडल्याचा आरोप करत, मुंबई मराठी माणसाचीच राहील असे त्यांनी ठामपणे सांगितले.