एका विशेष मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी मी अश्रू ढाळणारा नाही असे सांगत आपली कणखर भूमिका मांडली. राजकीय टीका वैयक्तिक नसून ती भाजप, अमित शाह, मोदी यांच्यावरही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नकली संतान टीकेला प्रतिउत्तर देत मातोश्रीने मोदींना कसे वाचवले, हे त्यांनी नमूद केले. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या चक्रावर चिंता व्यक्त करत, विकासासाठी सत्तेची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.