अण्णामलाईंच्या मुंबईवरील वक्तव्यावरून आदित्य ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केले आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याने भाजपच्या पोटात दुखत असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य आल्याने राजकीय वातावरण तापले असून, महायुती आणि मविआच्या प्रचारसभांचा धडाका सुरू आहे.