प्रतिभा धानोरकर यांनी भाजप आमदारांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असून, सत्ता हातातून निसटण्याच्या भीतीने आमदार घरोघरी पत्रके वाटत असल्याचे त्यांनी म्हटले. आगामी 15 तारखेच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भाजपची दयनीय अवस्था दिसून येत असल्याचे धानोरकर यांनी नमूद केले.