संजय राऊत यांनी ठाण्यात निष्ठावान विरुद्ध बेईमान अशी लढाई असल्याचे म्हटले. त्यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकजुटीवर भर देत, ठाणे महानगरपालिकेत ठाकरे बंधूंचा महापौर बसवण्याची जबाबदारी ठाणेकरांवर असल्याचे सांगितले. सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आणि थापेबाजीचे आरोप करत, महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.