डोंबिवलीच्या तुकाराम नगर परिसरात पुन्हा एकदा पैसे वाटपावरून राडा झाला आहे. एका उमेदवाराने भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. यावेळी उमेदवार रवी पाटील आणि त्यांच्या भावाला मार लागल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी वेळीच न पोहोचल्याने काही जण पळून गेले, असेही पाटील यांनी म्हटले. सध्या परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे.