बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतात खेळण्यास नकार दिला आहे. तसेच या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक असताना आयसीसी अडचणीत आली आहे. आयसीसीने बीसीबीला विचार करण्यास सांगितलं. पण त्यांनी त्यास नकार दिला आहे.