अदानींवरून जुंपली अन् फडणवीसांनी थेट यादीच वाचली!

राज ठाकरेंनी गौतम अदानींच्या प्रचंड वाढीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मोदींच्या काळातच ते मोठे झाल्याचा आरोप केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या अर्थव्यवस्था विस्तारल्याने अनेक उद्योगांची वाढ झाल्याचे आकडेवारीसह सांगत राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. मुंबई विमानतळाच्या भवितव्यावरूनही दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली.