निवडणूक आयोगाचा सत्ताधाऱ्यांना तिळगुळ! राऊतांचा गंभीर आरोप

प्रचार कालावधी संपल्यावरही राजकीय पक्षांना घरोघरी जाऊन प्रचार करण्याची निवडणूक आयोगाची परवानगी संजय राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केली आहे. सत्ताधारी पैशांचे वाटप करण्यासाठी या नियमाचा गैरवापर करत असल्याचा राऊतांचा आरोप आहे. शिंदे गट आणि भाजप पैशांचे वाटप व ध्रुवीकरण करून निवडणुका जिंकत असल्याची टीका त्यांनी केली.