देवेंद्र फडणवीस यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुतीच्या मोठ्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. ठाकरे बंधूंच्या एकजुटीला त्यांनी भीतीसंगम संबोधले. मराठी माणसाच्या विकासाची खरी व्याख्या त्यांनी समजावून सांगितली, तर अण्णामलाईंच्या बॉम्बे वक्तव्यावरही स्पष्टीकरण दिले. महायुतीने विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवली असून, हिंदुत्व हा त्यांचा मूळ विचार असल्याचे त्यांनी नमूद केले.