Maharashtra Election 2026 : कोणतीही सबब नको आणि.. प्राजक्ता माळी हिची मतदारांना कळकळीची विनंती

प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीने आगामी बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. प्रत्येक मत अमूल्य असून, कोणत्याही कारणास्तव मतदान टाळू नये असे तिने म्हटले आहे. मतदान हे केवळ आपला हक्क आणि अधिकार नसून, ते आपले महत्त्वाचे कर्तव्यही आहे, यावर तिने जोर दिला.