Maharashtra Election 2026 : मराठी माणूस खडबडून जागा झालाय… संजय राऊत म्हणाले, ठाकरे बंधूंच्या वादळामुळे…

मुंबई महापालिका निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले असताना, संजय राऊत यांनी ही केवळ निवडणुकीपुरती लढाई नसून, मुंबई धनदांडग्यांच्या घशात घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. 28 महानगरपालिकांसाठी मतदान सुरू असताना, राऊत यांनी केंद्र व राज्य सरकारवरही निशाणा साधला. घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेचा उल्लेख करत, त्यांनी मुंबईच्या राजकीय संघर्षावर प्रकाश टाकला.