संजय राऊत यांनी गणेश नाईक यांच्या हवाल्याने हरामाचा पैसा वाटला जात असल्याचा आरोप केला आहे. महायुतीमधील शिंदे गट आणि भाजप यांच्यात आपापसात संघर्ष असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रात अनागोंदी माजली असून, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी माणसासाठी एकत्र यावे, असे आवाहन राऊत यांनी केले आहे.