मतदान शाईच्या टिकाऊपणाबाबत पसरलेल्या संभ्रमावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. हीच शाई २०११ पासून वापरली जात असून, कोरस कंपनीच्या मार्कर पेनने ती लावली जाते. शाई पुसली जात असल्याचा दावा चुकीचा असून, दुबार मतदानाला प्रतिबंध घालण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जात असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. मुंबई महानगरपालिकेनेही चौकशीचे आदेश दिले आहेत.