मुंबईत ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला! काय लागणार निकाल?

राज्यभरातील २९ महापालिका निवडणुकांसाठी आज मतमोजणी होणार आहे, ज्यात मुंबई महानगरपालिकेचा निकाल महत्त्वाचा आहे. एक्झिट पोलनुसार मुंबईत महायुतीला सत्ता मिळण्याचा अंदाज आहे, तर ठाकरे बंधूंना धक्का बसण्याची शक्यता आहे. गेल्या २५ वर्षांपासून उद्धव ठाकरेंकडे असलेला मुंबईचा गड राखणार की महायुती सत्ता काबीज करणार, हे लवकरच स्पष्ट होईल.