बीएमसी निवडणूक २०२६ शांततेत पार पडली असली तरी, अनेक ठिकाणी गोंधळ दिसून आला. मार्कर शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी, ईव्हीएम बिघाड, मतदार यादीतील त्रुटी, बोगस मतदान आणि काही ठिकाणी मारामारीच्या घटनांमुळे मतदारांना मनस्ताप झाला. प्रमुख नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या असून निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.