राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी काल मतदान झालं आणि आज मतमोजणी होऊन निकाल हाती येत आहेत. राज्यात पालिका निवडणुकांसाठी अनेक पक्षांनी बऱ्याच ठिकाणी पक्षातील नेते यांच्या कुटुंबातील नातेवआईक, मुलं, मित्र यांना उमेदवारी दिल्याचे समोर आले. मात्र त्यापैकी बऱ्याच जणांना मतदारांनी नाकारले असून अनेकांना पराभवाचा फटका बसला आहे.