महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, मुंबईत भाजपने ऐतिहासिक आघाडी घेत सत्तेची संधी साधली आहे. याउलट, राज ठाकरेंच्या मनसेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या निकालांनंतर सोशल मीडियावर राजकारण नव्हे, तर 'रसमलाई' ट्रेंडमध्ये आहे. भाजपच्या विजयावर अनेकांनी राज ठाकरे आणि 'रसमलाई' या मीम्सची चर्चा करत अण्णामलाई प्रकरणाची आठवण करून दिली आहे.