महायुतीने मुंबई महापालिकेवर कब्जा मिळवत मोठा राजकीय विजय संपादन केला आहे. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले असून ठाकरे बंधूंना हा मोठा धक्का मानला जात आहे. तब्बल 25 वर्षांनंतर ठाकरे गटाच्या हातातून मुंबई महानगरपालिका निसटली असून, मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे.