विधानसभा आणि नगरपालिकेनंतर महापालिका निवडणुकीतही भाजपने महाराष्ट्रात नंबर वन पक्ष म्हणून बाजी मारली आहे. एकूण २९ पैकी २२ महापालिकांवर भाजपने झेंडा फडकवला, ज्यात पाच मोठ्या महानगरपालिकांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी विजय नोंदवण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.