पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील भाजपच्या विक्रमी विजयाबद्दल कौतुक केले. मुंबईतील विजयाचा जल्लोष आसामच्या काझीरंगामध्ये साजरा होत असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस मुंबईत चौथ्या-पाचव्या स्थानी घसरली असून महाराष्ट्रात ती पूर्णपणे संपुष्टात आल्याचे मोदींनी नमूद केले.