Congress BJP Alliance: युती, आघाडी होतील. पण काँग्रेससोबत कधीच जाणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. पण या नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपने चक्क काँग्रेसशी हातमिळवणी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राजकारणात कोणीच कुणाचा शत्रू अथवा मित्र नसतो हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या नव्या युतीमुळे एकच खळबळ उडाली आहे.