तुमचं घर कसं असावं? याबद्दल वास्तुशास्त्रात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार जर घराची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे असेल तर अशा घरात कधीही वास्तुदोष निर्माण होत नाही, घराची आर्थिक स्थिती उत्तम राहते, तसेच घरातील प्रत्येक सदस्याचं आरोग्य देखील उत्तम राहतं.