अमरावतीत चोरांचा धुमाकूळ! 15 मिनिटांत 3 घरे फोडली; पोलिसांवर प्रश्नचिन्ह

अमरावतीत चोऱ्यांच्या घटनांनी नागरिक चिंतेत आहेत. पाच न्यायाधीशांच्या घरांनंतर आता अवघ्या १५ मिनिटांत तीन सामान्य लोकांची घरे फोडण्यात आली. चोरांनी अत्यंत शांतपणे हे कृत्य केले असून, यामुळे पोलिसांच्या धाकावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सत्ताधारी नेत्यांनी या गंभीर विषयावर मौन बाळगले आहे.