संजय राऊत यांनी मालेगावच्या गिरणा सहकारी साखर कारखाना घोटाळ्यातील आरोपांवरून मंत्री दादा भुसे यांची माफी मागितली. त्यानंतर भुसेंनी राऊतांविरुद्धचा मानहानीचा खटला मागे घेतला. राऊतांनी हे आरोप चुकीच्या माहितीवर आधारित असल्याचे मान्य करत, त्यामागे अद्वय हिरे असल्याची माहिती दिली. या घडामोडीने महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.