अजित पवारांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडूंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. व्हीएसआर कंपनीशी टीडीपीचा संबंध असून चौकशीत फेरफार झाल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहनही रोहित पवारांनी केले आहे.