शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत असताना विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाही, ही अत्यंत चुकीची बाब आहे. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात अशी परिस्थिती असणे लोकशाहीसाठी योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.