मुंबई-विजयदुर्ग सागरी रो रो सेवा 1 मार्चपासून सुरू होणार

कोकणात जलवाहतुकीच्या नव्या युगाची सुरुवात होणार आहे. 1 मार्चपासून मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान सागरी रो-रो सेवा सुरू होत आहे. 620 प्रवासी आणि 35 वाहने नेण्याची क्षमता असलेल्या या रो-फॅक्स सेवेमुळे मुंबई-विजयदुर्ग प्रवास अवघ्या 7 तासांत पूर्ण होईल. शिमगोत्सवासाठी हे एक विशेष आकर्षण ठरणार आहे, तसेच कोकण रेल्वेला उत्तम पर्याय उपलब्ध होईल.