गुजरात सरकार विवाह नोंदणी कायद्यात मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. आता प्रेम विवाह किंवा पळून जाऊन लग्न करण्यासाठी आई-वडिलांची परवानगी बंधनकारक असणार आहे. अर्जाच्या 40 व्या दिवशी प्रमाणपत्र मिळेल, मात्र पालकांना WhatsApp द्वारे सूचित केले जाईल. मुलींचे फसवणुकीपासून संरक्षण हा या बदलामागील उद्देश असल्याचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी स्पष्ट केले.