धाराशिव आणि परळीत अवकाळी पावसाचा कहर! ज्वारी पिकाचे नुकसान

महाराष्ट्रातील धाराशिव आणि परळी तालुक्यात पहाटेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. काढणी केलेल्या ज्वारीला पावसाचा फटका बसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. विशेषतः परळी तालुक्यातील मांडेखेल शिवारात ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहे.