महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती विमानतळाजवळील धावपट्टीवर झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या अपघातात अजित पवारांसह चार इतर सहकाऱ्यांचा देखील मृत्यू झाला. विमान अपघात हा घातपात की नेमका अपघात याबाबत अनेकांकडून शंका व्यक्त केली जात आहे. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठ्या शंका व्यक्त केल्या आहेत. त्यांनी सांगितले की, ब्लॅक बॉक्स जळून गेला ही सर्वात मोठी शंका आहे.