जिल्हा परिषदांमधील आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याचे प्रकरण समोर आले असून या पार्श्वभूमीवर संबंधित निवडणुकांबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून निवडणुका घेण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. अंतिम सुनावणी होईपर्यंत निवडणुका घेणे उचित ठरणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले आहे.