लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. दिघोळ देशमुख परिसरात घरे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले असून, संसारोपयोगी वस्तू भिजल्या आहेत. विशेषतः एका मूकबधिर दाम्पत्याचे छप्पर उडाल्याने त्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे.