Wardha | अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, तूर पिकांचे नुकसान; शेतकरी हवालदिल

वर्धा जिल्ह्यातील काही भागांना अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला असून वादळी वारा आणि गारपिटीमुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी गव्हाचे पीक जमीनदोस्त झाले आहे. जिल्ह्यात काही भागांत गारपीटही झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिक भर पडली आहे.