अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात घारगाव-कोळगाव रोडवरील माऊली मंदिराजवळ पहाटे भीषण अपघात झाला. ट्रक आणि इको कार यांच्यात झालेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांसह चार जणांचा जागीच मृत्यू झाला. १३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.