शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने चर्चा करा! विजय वडेट्टीवार यांची मागणी

महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नांवर तातडीने चर्चा करण्याची मागणी केली आहे. गेल्या वर्षापासून शेतकरी संकटात असून, त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. बोनस, धान खरेदीचे पैसे थकीत आहेत, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे वडेट्टीवार म्हणाले.