Sanjay Raut : शिक्षण मंत्री म्हणतात 250 मराठी शाळा बंद झाल्या. "याला सरकार जितकं जबाबदार आहे, तितका मराठी माणूसही जबाबदार आहे असं संजय राऊत म्हणाले. मराठी शाळा का बंद होतात? याचा विचार मराठी समाजाने केला पाहिजे. आम्ही कॉन्वेंट, इंटरनॅशनल स्कूलच्या नादाला लागलोय. त्यामुळे महाराष्ट्रात मराठी संस्कृतीचं नुकसान होतय, मराठी शाळा बंद पडतायत" असं संजय राऊत म्हणाले.