कोकणातील बदलत्या हवामानामुळे हापूस आंब्याचा मोहोर काळा पडला असून, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पहिल्या टप्प्यातील मोहोर वाया गेल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मोहोरही खराब झाल्याने आंबा बागायतदार चिंतेत आहेत. वारंवार फवारण्या करूनही नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.