दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप शिवारात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काढणीला आलेले टोमॅटो, ज्वारी, गहू, हरभरा यांसारखी पिके भुईसपाट झाली आहेत. मोठे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी शासनाकडून तातडीने भरीव मदतीची आणि पंचनाम्याची मागणी करत आहेत.