अहिल्यानगर जिल्ह्यातील राजूर येथून निघालेला लॉंगमार्च आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, अंगणवाडी व आशा सेविकांच्या विविध मागण्यांसाठी पुढे सरकत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रालयात चर्चेचे निमंत्रण दिले असून, पाच मंत्र्यांसह मुख्य सचिव उपस्थित राहणार आहेत. बैठकीतून तोडगा निघेल का, याकडे लक्ष लागले असले तरी, हजारो आंदोलक अहिल्यानगरकडे मार्गक्रमण सुरूच ठेवणार आहेत.