Chanakya Niti : या लोकांना कधीच उसणे पैसे देऊ नका, बुडालेच म्हणून समजा

आर्य चाणक्य हे एक विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी माणसाने आपल्या हातात असलेल्या पैशांचा उपयोग कसा करावा? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. काही लोक असे असतात त्यांना उसणे पैसे दिल्यानंतर ते तुम्हाला परत कधीही मिळत नाहीत, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.