संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताचे प्रकरण सरकार हलक्यात घेत असल्याचा आरोप केला आहे. रोहित पवारांनी सदोष मनुष्यवधाची तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता, ती नाकारण्यात आली. सरकार या प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत असून, कंपनीत राजकारण्यांचे पैसे गुंतले असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.