मुंबईत औषधांवरील नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालाड भागातील फळांवर उंदीर मारण्याचे औषध लावल्याचा प्रकार पाहायला मिळाला आहे, ज्यामुळे अन्न सुरक्षा आणि महापालिकेच्या कारभारावरही टीका होत आहे. उंदरांनी फळं खाऊ नयेत म्हणून हे औषध लावल्याचा अजब दावा या फळविक्रेत्याने केला आहे.